अहमदनगर प्रतिनिधी /वसंत रांधवण : रूबाब उद्योग समुहाचे संचालक मा.श्री.अक्षय जी जाधव आणि नवउद्योजक दिपक भाऊ पिलगार यांचा शिववरद प्रतिष्ठानच्यावतीने वाढदिवसानिमित्त सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी कीशोर जी डागवाले साहेब बोलले की युवकांना स्पर्धेतील युगात जर आपला उद्योग व्यवसाय नव्या उंचीवर न्यायचा असेल तर आपण नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपला उद्योग व्यवसायात जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचला पाहीजे कस्टमर साठी मिनिमम प्राईज मधे दर्जेदार वस्तु आपण ठरलेल्या वेळेत उपलब्ध करून देण गरजेच आहे संभाषण उत्तम असण गरजेच आहे .आज रूबाब उद्योग समुह हा महाराष्ट्र आणि ईतर राज्यात देखील विस्तारला आहे याचा नक्कीच अहमदनगर शहराला अभीमान आहे.
यावेळी उपस्थित भा.ज.पा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.कीशोर जी डागवाले साहेब अँड सुनिल जी सुर्यवंशी शिववरद प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा.श्री. नितिन जी गोरख डागवाले , शिववरद प्रतिष्ठान चे आधारस्तंभ मा.श्री.रोहन जी कीशोर डागवाले माळी महासंघ अहमदनगर शहराध्यक्ष श्री.नितीन मामा डागवाले माळी माळी महासंघ कर्मचारी आघाडीचे शहराध्यक्ष मा.श्री.नंदकुमार नेमाणे माळी महासंघ जिल्हाध्यक्ष श्री.गणेश भाऊ बनकर आणि शिववरद प्रतिष्ठान चे पदाधिकारी उपस्थित होते. आभार रोहन डागवाले यांनी मानले.