Disha Shakti

Uncategorized

नेर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जमिनी गेल्या खरवडून; शेती पिकांचं मोठं नुकसान..

Spread the love

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : यवतमाळ जिल्ह्यात काही भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. तर काही भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला आहे. या पावसामुळं पिकं पूर्णतः उध्वस्त झाली असून, अनेक ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या आहेत. गेल्या तीस वर्षात इतका पाऊस गावात पडला नव्हता, एवढा पाऊस झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

शेतकऱ्यांनी जमिनीत स्वप्न पेरले होते. मात्र तो साखर झोपेत असतानाच त्याचे हे स्वप्न या पावसाने पुरते वाहून नेले. ज्या मातीच्या आधारे हे स्वप्न वर येते त्या मातीसहित या स्वप्नांचा चिखल झाला. शेतात उरले फक्त दगड अन् खड्डे. मुसळधार कोसळलेल्या पावसानं सावरगाव, गोळेगाव , ब्राह्मनवाडा, शिरजगाव, पांढरी, पिंपळगाव काळे शिवारातील जवळपास 114 हेक्टर जमिनीवरील पिके पूर्णतः उध्वस्त झाल्याचा अंदाज आहे. एका पावसाने शेतकरी उघड्यावर पडले आहेत. जमिनी गेल्या खरवडून, शेतातील पिकं गेली वाया पावसामुळे अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. ती दुरुस्त करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. मागच्या वर्षीची अतिवृष्टी, नापिकी यातून सावरत नाही तोच यावर्षी मुसळधार पाऊस दारावर आला. सावरगाव येथील शेतकरी प्रवीण भोयर यांच्या चार भावांच्या कुटुंबात 28 एकर शेती आहे.

यातील जवळपास वीस एकर शेतातील उभे पीक उध्वस्त झाले आहे. त्यांच्या शेतातील जवळपास चार एकर जमीन पार खरडून गेली आहे. प्रमोद यांनी दोन वेळा कपाशीची लागवड केली होती. त्यात या पावसाने त्यांचे पूर्ण स्वप्न उध्वस्त झाले आहे. कर्ज काढून केली होती लागवड साखळी नदीला जोडणारा नाला फुटल्याने त्याचे पाणी शेतात शिरले आहे. पाहता पाहता सारे पीक वाहून गेले आहे. यात या शेतकऱ्यांचे बी, बियाणे, खते, मजुरी असे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच पण माती खरडून गेल्याने जमीन पडीक पडणार आहे. या पावसाचा जोरदार फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतातील पीक गेलं, पावसाने मातीही नेली खरडून, आधीच कर्ज काढून लागवड केली होती. आता बियाणे घ्यायला पैसे आणायचे कुठून अन् पेरायला मातीच नाही तर पेरायचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न, औषधोपचार कसा करायचा? असंख्य प्रश्नांची मालिका या पावसाने शेतकऱ्यांपुढे उभी केली आहे.आता हे सर्व शेतकरी मदतीसाठी प्रशासनाकडे आस लावून बसले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!