विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत रेल्वेचे तीन ते चार डब्बे जळून पूर्ण खाक झाले आहेत. अद्याप जीवितहानी झाल्याची माहिती मिळू शकलेली नाही. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आगीत रेल्वेचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अहमदनगर आष्टी रेल्वेला नगर तालुक्यातल्या शिराडोह परिसरात आग लागली. रेल्वेच्या दोन डब्यांमध्ये ही आग भडकली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही अशी माहिती समजते. आग लागल्याच्या घटनेनंतर पोलीस आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या आगीत रेल्वेचं प्रचंड नुकसान झालं आहे. वर्षभरापूर्वीच अहमदनगर आष्टी ही रेल्वे सुरु करण्यात आली होती. रेल्वे विद्युतीकरणासाठी काही काळ बंद करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रेल्वेसेवा सुरू झाली होती.
Leave a reply